Saturday, March 19, 2011

उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते . ह्या दोन शतकातील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर डार्विनचा उत्क्रांतिवाद ! अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय ? आपण पाहू ही अन्धश्रध्दा कशी ठरते ते . सर्वसामान्याना ह्याचा परिचय माकडापासून माणूस झाला ह्या वाक्याने असतो . ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे " जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे . कसा ते आता पाहू .
अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष उत्क्रान्तिवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे . प्रकृतिच्या (नेचरच्या) संकटातून वाचणारे कोण ? तर जे सक्षम आहेत . आणि सक्षम कोण आहेत तर जे प्रकृतिच्या (नैसर्गिक) संकटातून वाचले आहेत . ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना कोण सक्षम आहेत हे सांगतात ना कोण नक्की वाचले आहेत हे सांगतात . अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे.आता ह्यातील उपसिध्दान्त म्हणजे , सुरुवातीला जलचर व वृक्ष होते, नंतर ते जमिनीवर आले . मासा पक्षी बनला हा त्याच सिध्दान्ताचा निष्कर्ष . कारण काय ? तर प्राकृतिक संकटामुळे त्याने स्वत:मध्ये अनुकुलन केले व उडण्यासाठी पंख व श्वासांसाठी नाक विकसित केले. हे कधी केले तर कोट्यवधी वर्षांपूर्वी . तेव्हा झाले ना मग आता का होत नाही ? पाण्यातुन बाहेर काढलेला मासा पक्षी बनत नाही तर मृत्यु पावतो . ह्याला उत्तर काय ? तर असे अनुकुलन होण्याची प्रक्रिया कोट्यावधी वर्षांची आहे. ह्याचाच अर्थ हे अनुकुलन कसे होते हे कुणीच शास्त्रज्ञ प्रयोगाने सिध्द करू शकणार नाही .
आता ह्यांच्याच म्हणण्यानुसार शार्क , मगरी , झुरळ इ. सर्वात प्राचीन प्राणी आहेत . मग ह्या जाति उत्क्रान्त न होता , तशाच का टिकून आहेत ? उत्तर नाही. आता ह्या पैकी काही मगरी, शार्क ह्यांचींच उत्क्रान्ति कशी झाली ? सांगता येत नाही . ंमासा व पक्षी ह्यांच्यामधील प्राणी का अस्तित्त्वात नाही ? उत्तर नाही . जी एक दोन जीवाश्मे ह्या मधल्या प्राण्याबाबत दाखवली जातात ती संशयास्पद आहेत . निर्विवाद नाहीत (जीवशास्त्रज्ञाना विचारा)
हाच प्रकार माकडाच्या एका जातिपासुन माणूस बनला ह्या मध्ये आहे. मधल्या जातिच अस्तित्वात नाहीत. एकूण विचार करता ह्याला शास्त्रीय सिध्दान्त म्हणणे हा विनोद होइल. लाखो-कोटि वर्षांची प्रक्रिया दाखवली की प्रयोग व पुरावा दोन्हीची आवश्यकता समाप्त होते . सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनिर्मिति आणि उत्क्रान्तिची मुख्य कारणे योगायोग आहेत . पृथ्वीवरच पाणी का निर्माण झाले ? कारण सुर्यापासुनचे विशिष्ट अंतर . अमिनो असिड मधले नायट्रोजन संयुग कशामुळे ? तर योगायोग. एकपेशीय बहुपेशीय कसे बनले ? संरंक्षणासाठी. पण हा सरंक्षणाचा विचार मेंदु नसताना कसा आला? उत्तर नाही .. एकुण एक सर्व प्रक्रिया ठराविक क्रमाने घडणाऱ्या योगायोगांवर अवलंबून आहे . हे काय विज्ञान झाले ?? ...............आता तुम्ही म्हणाल हे जर एवढे तर्कदुषित आहे, तर ही थेअरी एवढी प्रसिध्द का ?????????? त्याचे कारण दिसणारी समानता !!
मासे व पक्षी , चिंपांझी व माणूस ह्यांच्या गुणसूत्रांत समानता दिसते ह्याचा अर्थ असा नव्हे की एक दुसऱ्यापासून बनला . कुठला ही सबळ पुरावा व तर्कशास्त्रीय आधार नसताना वैज्ञानिकांना ह्या समानतेच्या आधारावर उत्क्रांतिच्या सिध्दांतावर पोचावे असे का वाटले ? कारण त्यांना विश्वनिर्मितीचा दुसरा प्राचीन सिध्दान्त लवकरात लवकर निकालात काढायचा होता .त्यासाठी मग हिमयुग , अश्मयुग , डायनोसोर युग इ. मिथ्या कल्पना बनवण्यात आला. त्याना मिथ्या अशासाठी म्हणत आहे कारण त्यांना कोणताही तर्कशास्त्रीय आधार नाही व प्रत्यक्षजन्य पुरावा नाही.
डायनोसोर युगासंबंधी थोड इथे सांगितल पाहिजे . ह्या विचित्र प्राण्याचे संपूर्ण सांगाडे कुठेही सापडलेले नाहीत . मोठी हाडे व हाडांची रचना सापडलेली आहे जी दुसऱ्या अज्ञात प्राण्यांची ही असु शकते . कल्पनेने वैज्ञानिकांनी हा प्राचीन प्राणी कसा असेल ह्या विषय़ी अंदाज बांधले आहेत. हा प्राणी कसा नष्ट झाला , कोणा कडेच सबळ थेअरी नाही. उल्कापाताने नष्ट झाला वगैरे कल्पना आहेत. निसर्गात नेहमी समतोल दिसुन येतो . डायनोसोर सारखा असंतुलित प्राणि जर पृथ्वीवर असता तर इथले सारे जीवनच धोक्यात आले असते . साहजिकच माणूस त्यावेळी उत्क्रांत झाला नसता . हेच नेमके ह्या वैज्ञानिकाना व तत्ववेत्यांना हवे होते. डायनोसोर ची थेअरी मांडली की आपोआप उत्क्रांतिवादाला आधार मिळतो व समाजाच्या मनातील विश्वनिर्मितिच्या अन्य श्रध्दा सहज हद्द्पार करता येतात.
जलचर, उभयचर, वृक्ष, माकडे , माणसे , कीटक, पक्षी ह्यांच्यातील जनुकीय समानते वरुन एक दुसऱ्यापासून उत्पन्न झाला अशा निष्कर्षापेक्षा , हे सर्व एकाचवेळी उत्पन्न झाले असा सिध्दान्त फार पूर्वी पासून मानव समाजाने श्रध्देने धरुन ठेवला आहे. हा समाज म्हण्जे पृथ्वीवरील धार्मिक लोकांचा समाज होय. धार्मिकलोक हे उपयोजित विज्ञानाबरोबर तर्कशास्त्र व तत्वज्ञान ह्यांचाही विचार करायचे . आजचे वैज्ञानिक निव्वळ उपयोजित विज्ञानावर विसंबून तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे दोघांचे निष्कर्ष वेगवेगळे येतात . आपण उदाहरण घेऊन समाजावुन घेऊ.
अणु हा जड आहे हे सर्वांना मान्य आहे. अनेक अणु एकत्र येऊन त्यांच्यापासुन प्रथम अमिनो असिड व नंतर एकपेशीय जीव निर्माण होण्याचे कारण काय ? आधुनिक विज्ञान सांगते योगायोग !!! आता योगायोग व्हायला काही कारण ? दुसरा योगायोग जे चुकीचे उत्तर ठरेल . कारण त्याने अनवस्था हा तर्कदोष निर्माण होतो. अनवस्था म्हणजे कधीही न संपणारी कारणपरंपरा . अनएन्डिग लूप . त्यामुळे हा सिध्दान्त चुकीचा ठरतो.
तर्कशास्त्रात कारणे दोन प्रकारची असतात . उपादान आणि निमित्त ! उपादान कारण म्हणजे, कारण स्वत:च कार्यात रूपांतरित होणे . उदा. दुधाचे दही बनणे. निमित्त कारण म्हणजे , जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये. अणु किंवा डीनए हे जर उपादान कारण असतील तर, रुपांतरणानंतर उत्क्रांति थांबली पाहिजे .पण वैज्ञानिकांच्यामते उत्क्रांति अजुनही सुरुच आहे . त्यामुळे अणु हे विश्वनिर्मितिचे उपादान कारण होऊ शकत नाही. मग साहजिकच विश्वनिर्मितेचे कारण निमित्त व तटस्थ असले पाहीजे. हे निमित्त कारण वैज्ञानिक कधी ही मान्य करत नाहीत . कारण ह्या तर्काने त्यांच्या काल्पनिक उत्क्रान्तिवादाचे खण्डन होते व हा तर्क सरळ सरळ ईश्वराकडे घेऊन जातो .

1 comment:

  1. http://www.thehindu.com/opinion/editorial/article2351410.ece

    ReplyDelete