Thursday, January 13, 2011

इंटरनेट वर डाउनलोडेबल स्वरुपात असणाऱ्या संस्कृत व प्राच्यविद्येवरील ग्रंथांच्या लिंक्स ....


http://sanskritdocuments.org/scannedbooks/MarathiIISc.html

http://sanskritdocuments.org/scannedbooks/SanskritIISc.html

http://www.sanskrit.nic.in/ebook.htm

http://sanskritdocuments.org/scannedbooks/asiallpdfs.html

http://is1.mum.edu/vedicreserve/index.htm

वरील साइट्स वर अनेक दुर्मिळ ग्रन्थ उपलब्ध आहेत..

काळ्या खोल दऱ्या ......

काळ्या खोल दऱ्या जिथे प्रेम नाही

नरकवास याहून भला कथिला कुणीही ?

परमार्थज्ञानफल हेच जर विधिलिखित

व्यर्थ भुसा कुटणे स्वयं ब्रह्मा वदित !!१!!



वाचे यदा मी अनेकभक्तचरित्रे

प्रेमाविना न दुसरे दिसलें तयातें

ह्रदि आर्तताच आवडे ईश्वराला

त्याहून अन्य पूजा न मागे स्वतःला !!२!!



वेदान्तग्रन्थ पठतो नित्य सावित्री जपतो

परंतु सदा मी केवळ घसा श्रमवितो

आत्मा ह्या द्विशब्दासह न ऊठे प्रेम जरि ही

होणार कसे ध्यान, कथे स्वतः वेदान्तधी ही !!३!!



समर्थ बोलले महाप्रेम करूणाष्टकांत

नेत्री न ये रे तुजवीण निद्रा म्हणून

अशी भावना कवे होईल माझी ?

आत्मदर्शनास्तव झोप जाईल माझी? !!४!!



रामकृष्ण ही वदले वचनामृतांत

स्वतःसाठी केवढे रडतो विचार मनास !

वाहेल का अश्रूधार बघण्या ईश्वरास ?

ही द्विरामवचने मी पुसतो स्वतःस !!५!!

Tuesday, January 4, 2011

पुढचे लेख

प्राचीन युग कालगणना

भारताच्या इतिहासातील महापुरुषांचे खरे काळ ......

आपले पूर्वज विमाने ऊडवत होते का ?

पाऱ्याच्या प्राचीन गूढ करामती...

Monday, January 3, 2011

पृथ्वी त्रिकोणी आहे काय ??

व्यावहारिक ज्ञान व विज्ञान हे गृहीतकांवर आधारित असते . अपेक्षित उद्देश व उपयोजन साधले जात असेल , तर गृहीतके वेगळी असली तरी चालू शकते. जसे आयुर्वेदातिल त्रिगुणांचे गृहीतक, आधुनिक वैद्यकापेक्षा निराळे आहे पण रोगपरिहार हे दोन्हींचे समान फल आहे .तसेच सूर्याभोवती पृथ्वी फिरते मानणे व पृथ्वी भोवती सूर्य फिरतो असे मानणे , यापैकी काहीही मानले तरी कालमापनात फरक पडत नाही. गृहीतके कालानुसार व संस्कृतीनुसार बदलत राहतात, पण तेवढ्याने परंपरेचा उच्छेद करणे व पूर्वजांची निंदा करणे योग्य ठरत नाही. आपण या लेखात अशाच एका गृहीतकाचा, पृथ्वीचा विचार करणार आहोत.

शब्दांचा जो अर्थ आपण घेतो तोच अर्थ प्राचीन घेत नव्हते. पृथ्वी हा भूलोकाला समानार्थी शब्द आहे. सप्त उर्ध्व लोकांपैकी सर्वात खालचा लोक भूलोक आहे. त्यालाच पृथ्वी असे पुराणात म्हंटले आहे . पृथ्वी शब्दाचा राजा पृथुशी संबंध आहे. पूर्वी कृतयुगात त्याने पृथ्वीचे दोहन केले म्हणून त्याला पृथु नाव मिळाले.

वैदिक शास्त्राने प्रत्येक वस्तु देवता कल्पिलेली आहे. ब्रह्म सर्वव्यापक आहे व तेच एकमेव चेतन आहे हा सिद्धान्त त्यामागे आहे . सर्व जगत एकाच ईश्वराच्या चेतन विभूति असल्याने, प्रत्येक जड वस्तुमागे ही चेतनत्व आहे. हे चेतनत्वच देवता आहे. सूर्य , चन्द्र, गुरु इ. ग्रह जड रुपाने आकाशात फिरतात.पण त्यांचीही चेतन रुपे आहेत, त्यांनाच देवता म्हणतात. फलज्योतिषशास्त्र ह्या संकल्पनेवरच अवलंबुन आहे.नुस्त्या जड भ्रमण करणाऱ्या आकाशातिल ग्रहांचा पृथ्वीवरील मानवांवर काहीही प्रभाव पडत नाही. उदा: सात अश्वांचा रथ ओढणारी तेजस्वी देहमय सूर्य देवता आहे. देवगुरु बृहस्पती हे गुरु ग्रहाचे देवतारुप आहे. अशाच प्रकारे दुर्ग,नगर,संवत्सर,युगे,मुहुर्त,दिशा,नक्षत्र,वेद यांच्याही देवता आहेत. त्या त्या देवता प्रसन्न झाल्यावर त्यांच्या मूर्त स्वरुपाचे संपूर्ण द्न्यान करुन देतात.सूर्य भुवनांचे द्न्यान करुन देतो. पूर्वी मयासुराने व वराहमिहीराने असेच ज्योतिष द्न्यान प्राप्त केले आहे. कुठल्याही वस्तूचे द्न्यान त्यावस्तुने स्वतःच करुन दिल्याशिवाय पूर्णरुपाने होणार नाही. आजच्या शास्त्रद्न्यांप्रमाणे अनंत काल पर्यंत कल्पना लढवत बसणे हा व्यर्थ मार्ग आहे.

अशाच प्रकारे पृथ्वीचे देवतारुप गाय आहे. गाय ज्याप्रमाणे दूध देऊन पोषण करते, त्याप्रमाणेच पृथ्वी अन्न देऊन पोषण करते. मनुष्याच्या जन्माला वीर्य कारणीभूत आहे व वीर्य अन्नापासून बनते. अन्न पृथ्वीपासून येते, त्यामुळे सर्व प्राणिमात्रंच्या जन्माला व्यापक अर्थाने पृथ्वी कारणीभूत आहे. पृथ्वी त्यामुळेच सर्वांची माता ठरते. गाय हे पृथ्वीचे देवतारुप असल्याने, गाय ही सर्वांची माता ठरते. सावरकरांनी म्हण्टल्याप्रमाणे ती केवल, बैलांची माता ठरत नाही. ती सर्व मनुष्य ,देवता आदि सर्वांची माता ठरते. म्हणूनच वैदिक धर्माने गाईला पूजनीय केले आहे. हे झाले पृथ्वीचे देवतारुप ! पृथ्वीचे मूर्तरुप ही योगबलानुसार भिन्न भिन्न दिसते. सामान्य जीवांना ती चेंडू सारखी गोल प्रतीत होते, तर असामान्य योगबल असणाऱ्याना त्रिकोणाकृती दिसुन येते. सामान्य दृष्टीने ती आकाशात तरंगत आहे, तर योगज दृष्टीने ती सप्त द्वीपे व सप्त सागर ह्यांनी युक्त असुन भगवान शेषांनी आपल्या फणेवर धारण केली आहे. हे समजण्यासाठी आपण थोडा प्राचीन वैदिक भूगोल बघू, हा बराच रहस्यमय आहे.

पृथ्वी सात द्वीपानीयुक्त असुन सर्वात केन्द्र स्थानी जम्वू द्वीप आहे. खाली दाखवल्याप्रमाणे जम्बुद्वीपा भोवती लवणसागर व त्या भोवती इतर सहा द्वीप व सहा सागर आहेत.

सप्तद्वीप सप्तसागर
जम्बु लवण
प्लक्ष इक्षुरस
शाल्मल मदिरा
कुश घृत
क्रौञ्च दधि
शाक दुग्ध
पुष्कर गोड पाणि

ह्यापैकी जम्बुद्वीप म्हणजे सध्या सामान्य दृष्टीने अनुभवायला येणारी पृथ्वी. तिच्या भोवती लवण सागर आहे. अर्थात खाऱ्यापाण्याचा समुद्र आहे. इतर चवींचे समुद्र ह्या भासमान पृथ्वीवर कुठेही नाहीत. त्यामुळे अनेक अभ्यासकांनी पुराणातील भूगोल ह्या पृथ्वीवर शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याना यश मिळाले नाही. ह्या जम्बुद्वीपातील फक्त भूगोल ह्या दृश्य पृथ्वीवर सापडू शकतो. जम्बूद्वीपात नऊ वर्षे आहेत.[विशिष्ट संस्कृती असलेल्या भूभागाला संस्कृत मध्ये वर्ष म्हणतात] इलावृत्त, भारत,किम्पुरुष,हरि, रम्यक ,हिरण्यमय , उत्तरकुरु , भद्राश्व आणि केतुमाल. ह्यापैकी भारतवर्ष म्हणजे प्रस्तुत सिन्धुपासुन कन्याकुमारि पर्यंत असलेला भारत देश. इतर वर्षे इतर देशांच्या रुपाने आजही विद्यमान आहेत. तिथे पूर्वी निरनिराळ्या रुपात वैदिक उपासनाच चालत असे. आता मात्र तिथे म्लेंच्छ धर्म फोफावला आहे. तरी देखील प्राचीन ग्रन्थावरुन व त्यांच्या इतिहासावरुन त्या वर्षाचे आजचे स्थान कळू शकते. उत्तर कुरु म्हणजे दक्षिण अमेरिका, केतुमाल वर्ष म्हणजे आफ्रिका , भद्राश्ववर्ष म्हणजे जपान-कोरिया, किम्पुरुषवर्ष म्हणजे इंडोनेशीया,कम्बोडिया आदि .आग्नेय देश. ह्या वरती अधिक संशोधन आवश्यक आहे. तर अशी सप्तद्वीपात्मक पृथ्वी भगवान शेषांनी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. शेष , पृथ्वी आणि त्रिकोणाकृती ह्यांचा परस्पर काय संबध आहे ते आत बघू.

भूमितीशास्त्राप्रमाणे रेषा म्हणजे अनंत त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचा भाग! तद्वतच सरळ पृष्ठभाग म्हणजे अनंत त्रिज्या असलेल्या घनगोलाचा मर्यादित पृष्ठभाग ! त्यामुळे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे इन्टिग्रेशन करुन घनगोलाच्या पृष्ठभागाचे एकन्दर क्षेत्रफल काढता येते. भौतिकशास्त्रातला दुसरा नियम असा की नैसर्गिक बनणारा पदार्थ असा आकार घेतो की पदार्थाचे क्षेत्रफळ हे त्याच्या असलेल्या घनफळाच्या कमीत कमी रहावे जेणे करुन कमीत कमी उर्जा ख्रर्च होईल . उदा: पावसाचा थेंब गोल आकाराचाच बनतो. यानुसार ठराविक घनफलाच्या वस्तुचा कमीत कमी ऊर्जा खर्च करुन बनलेला आकार म्हणजे घनगोल होय.ह्या प्राथमिक माहिती नंतर आपण गुरुत्वाकर्षणाकडे येऊ. गुरुत्वाकर्षण हे त्रिमितिय जगाच्या रचनेला कारणीभूत आहे. गुरुत्वाकर्षण नसेल तर हे जग द्विमितिय बनेल. गुरुत्वाकर्षण समजा नष्ट झाले तर वर पाहिलेल्या भौतिक शास्त्राच्या नियमानुसार कमीत कमी ऊर्जा खर्च करुन बनलेला द्विमितिय पृष्ठभाग म्हणजे त्रिकोण होय. ऊर्जेची जास्तीत जास्त बचत हा निसर्गनियम असल्यामुळे , द्विमितिय जगात नैसर्गिक पृष्ठभाग हा त्रिकोण असेल. ह्याच प्रमाणे आपल्याला अनुभवायला येणाऱ्या त्रिमितिय जगात पृथ्वी, चंद्र , सूर्य हे सर्व घनगोलाकार आहेत. प्रत्येकामध्ये गुरुत्वाकर्षणऊर्जा आहे, ह्या ऊर्जेनेच त्यांना त्रिमितिय बनवले आहे. आता जर गुरुत्वाकर्षण जर दूर केले तर हे सर्व ग्रह त्रिकोणाकृती बनतील. हा सिध्दांत समजणे फार महत्वाचे आहे.

जीवाच्या सूक्ष्म (लिंग) देहात सात चक्रे कल्पिलेली आहेत त्या चक्रांची सुरुवात गुद व लिंग ह्यांच्या मधील शिवणीच्या स्थानापासुन होते. ते मूलाधारचक्राचे स्थान आहे. तिथपासुन मस्तकापर्यन्त सात चक्रे कल्पिलेली आहेत, जी प्राणाच्या साहाय्याने योगामध्ये भेदली जातात. अपान हा प्राण ह्या मूलाधार चक्राशी संबंधीत आहे. त्याची दिशा खालची आहे व तो देह पृथ्वीवर उभा राहण्यास कारणीभूत असतो. माकड हाड हे त्याचे स्थान आहे. अपानामुळे देह गुरुत्वाकर्षणाला विरोध करुन उभा राहू शकतो. जे योगी अपानावर विजय मिळवतात , ते आकाशात ऊडु शकतात. योगशास्त्रानुसार मूलाधारचक्राशी संबंधीत तत्व पृथ्वी आहे. त्याचा गूढ आकार समभुज त्रिकोण आहे, व हया त्रिकोणाखाली कुण्डलिनी शक्ति निवास करते. हे झाले व्यष्टिनिरुपण ! याच धर्तीवर समष्टिस्वरुपात भूगोल हा पहिला लोक आहे, समष्टी अपानविरहित त्याचा आकार त्रिकोणकृती आहे व हा लोक भगवान शेषाच्या फणेवर आहे. सामान्य दृष्टी दूर करुन योगज दृष्टीने पाहिल्यास वरील विवेचन समजुन घेता येईल.

भारतीय प्राचीन ज्योतिषांनीही पृथ्वी घनगोल व आकाशात तरंगती मानली आहे. पण हे सामान्य स्वरुप आहे. जे सामन्यांना ज्ञेय आहे. गाय हे पृथ्वीचे देवतास्वरुप आहे जे उपासनेस योग्य आहे. त्रिकोणाकृती सप्त द्वीपात्मक व सप्त सागरात्म्क पृथ्वी अर्थात भूलोक जो शेषाच्या मस्तकावर आहे ते पृथ्वीचे योगज स्वरूप आहे. ज्योतिषीय पृथ्वी ही वस्तुतः जम्बुद्वीप आहे असे ही म्हणता येऊ शकेल. श्री भागवतात जम्बु द्वीपाचा आकार खालील प्रमाणे सांगितला आहे.

यो वायं द्वीपः कुवलयकमलकोशाभ्यन्तरकोशो नियुतयोजनविशालः समवर्तुलः यथा पुष्करपत्रं !५! [भागवत ५-१६]

अर्थ:- भूलोकरुप कमल कोषाच्या आत जी सात द्वीपे आहेत त्यापैकी सगळ्यात आत जो कोष म्हणजे जम्बु द्वीप होय. त्याचा विस्तार एक लक्ष योजन आहे व ते कमलपत्राप्रमाणे समगोल आहे.

पृथ्वीची घनगोल , त्रिकोणाकृती आणि गो-माता ही तिन्ही स्वरुपे त्या दृष्टीने योग्य आहेत. श्री गुलाबराव महाराज ह्या संबंधात काय म्हणतात ते पाहु व ह्या लघुलेखाचा शेवट करु.

कटिस्थानी असे धरणी ! कंदस्थानी कुण्डलिनी !

ती जेवी का सहस्त्रफणी ! तेवीच असे !!

म्हणोनी शेषावरी धरणी ! ऐसे बोलिले पुरांणी !!

व्यष्टि पृथ्वीचा शेष कुण्डलिनी ! समस्त पृथ्वीचा सहस्त्रफणी !! [य़ोगरहस्य ]

References:-
Surya Siddhanta-Chapter-7
Vishnu Purana
shri Bhagwat..

सूर्यसिद्धन्तानुसार(भूगोलाध्याय)पृथ्वीचे गोलत्व आणि तत्कालीन महत्वाची शहरे

समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः /
द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः //

भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता /
भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा //

याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी /
पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता //

उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता /
तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः /

{लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे}
{ (लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल.}


खालील श्लोकावरुन कळून येईल की प्राचीन वैदिक ज्योतिषांना पृथ्वीच्या जड स्वरूपाचे अचूक ज्ञान होते. तिचे चेतनस्वरूप मात्र त्यांनी गूढ त्रिकोणात्मक सांगितले आहे.

अन्ये अपि समसूत्रस्था मन्यन्ते अधः परस्परम् /
भद्राश्वकेतुमालस्था लङ्कासिद्धपुराश्रिताः //

सर्वत्रैव महीगोले स्वस्थानम् उपरि स्थितम् /
मन्यन्ते खे यतो गोलस् तस्य क्वोर्धवम् क्व वाधः //

अल्पकायतया लोकाः स्वस्थानात् सर्वतो मुखम् /
पश्यन्ति वृत्ताम् अप्य् एताम् चक्राकाराम् वसुन्धराम् //