Wednesday, May 18, 2011

List of 84 asanas

List of 84 asanas ..just found on Net... Adding here for reference in future


1. Siddhasana
2. Bhadrasana
3. Vajrasana
4. Simhasana
5. Silpasana
6. Four types of Padmasana – i. Bandha Padmasana
7. ii. KaraPadmasana
8. iii. Samputita Padmasana
9. iv. Suddha Padmasana
10. Six types of Mayurasana – i. Danda Mayurasana
11. ii. Parsva Mayurasana
12. iii. Sahaja Mayurasana
13. iv. Bandha Mayurasana
14. v. Pinda Mayurasana
15. vi. Eka Pada Mayurasana
16. Bhaivarasana
17. Kamadahanasana
18. Paripatrasana
19. Karmukasana
20. Svastikasana
21. Gomukhasana
22. Virasana
23. Mandukasana
24. Markatasana
25. Matsyendrasana
26. Parsvamatsyendrasana
27. Baddhamatsyendrasana
28. Niralambanasana
29. Candrasana
30. Kanthavasana
31. Ekapadakasana
32. Phanindrasana
33. Pascimatanasana
34. Sayitapasimatanasana
35. Citrakarani
36. Yoga Nidra
37. Vidhunanasana
38. Padapidanasana
39. Hamsasana
40. Nabhitalasana
41. Akasasana
42. Utpadatalasana
43. Nabhilastapadakasana
44. Vrscikasana
45. Cakrasana
46. Utphalakasana
47. Three types of Kurmasana i. Uttanakurmasana
48. ii. Kurmasana
49. iii. Baddhakurmasana
50. Narjavasana
51. Kabandhasana
52. Goraksasana
53. Angusthasana
54. Mustikasana
55. Bhramaprasaditasana
56. Five Kukkutas such as i. Pancaculi Kukkuta
57. ii. Ekapadakakukkuta
58. iii. Akarita Kukkuta
59. iv. Bhandaculi Kukkuta
60. v. Parsvakukkuta
61. Ardhanarisvarasana
62. Bakasana
63. Dharavahasana
64. Candrakantasana
65. Sudhasarasana
66. Vyaghrasana
67. Rajasana
68. Indraniasana
69. Sarabhasana
70. Ratasana
71. Citrapithasana
72. Baddhapaksi-asana
73. Isvarasana
74. Vicitranalinasana
75. Kantasana
76. Suddhapaksi-asana
77. Sumandraka
78. Caurangi-asana
79. Krauncasana
80. Drdhasana
81. Khagasana
82. Brahmasana
83. Nagapitha
84. Savasana

Chapter 3-Hatha Ratnavali

Tuesday, May 17, 2011

बोगस अध्यात्माची सुरसकथा-१

सदर विषयावर लेखन करायच अनेक दिवसांपासून मनात होत. पण आधीच आध्यात्मिक गुरुंची प्रतिमा चांगली नाही, त्यात मी स्वतः आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे . त्यामुळे हा विषय माझ्यासाठी थोडा नाजूक बनला होता. पण मग जे आपण निष्कर्ष काढले आहेत, विचार केला आहे (तो १००% बरोबर आहे अशी खात्री आहे) तो मांडला पाहिजे अस मला वाटल.
मी इथे काही मुद्दे वार निष्कर्ष मांडणार आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल. लेखामध्ये स्पष्टीकरणाच्या ओघात विषय भरकटण्याची शक्यता असते.
हे निष्कर्ष सांगण्यापूर्वी मला एवढेच सांगायचे आहे, समस्त आध्यात्मिक साधकांना किंवा जिज्ञासुंना, मी विस्तृत वाचन , विचार, अनुभव आणि परीक्षण ह्या नंतर हे निष्कर्ष काढले आहेत.
मी अजुन ही पूर्ण आध्यात्मिक आहे, पारंपारिक वैदिक विचारांचा पुरस्कर्ता आहे, व सश्रध्द आस्तिक आहे. समस्या कुठे आहे हे आपल्याला खालील मुद्दे वाचुन कळेल.
एक सूचना- नास्तिक बुध्दिवाद्यांनी आपल्या बाजुने हा काही पुरावा मानु नये. जे सश्रध्द आस्तिक आहेत , त्यांच्या साठीच हा विषय आहे.
१. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. शिष्याने गुरु कडे जावे हा प्राचीन आदेश मोडून गुरुच समुद्र उल्लंघायची बंदी मोडून परदेशात जाऊ लागले व शिष्य शोधू लागले. असे करताना त्यांना सर्व नियम-यम मोडावे लागले , व पाश्चात्य शिष्यांनुसार उपदेशात बदल करावा लागला.
२.चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता. आधुनिक गुरुनी प्रसिध्दी साठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अ‍ॅड्जस्ट केला, व ते ही बोलू लागले, लोकांनो स्वर्ग-नरक जे काही आहे ते ह्या पृथ्वीवरच आहे, ह्या जीवनातच अनुभवायचे आहे. पारंपारिक अध्यात्म स्वर्ग-नरकांचे मरणोत्तर अस्तित्व सांगत होते.
३.चमत्कार हा पारंपारिक सिध्दत्वाची निषाणी होती. चमत्कार तेथे नमस्कार हा साधा नियम होता. ज्यांच्या जवळ कुठले ही सामर्थ्य नव्हते, अशा गुरुंनी सांगायला सुरुवात केली , चमत्कार म्हणजे हातचलाखी, ते दुय्यम दर्जाचे ! .................. विचार बघा...उच्च मानसिक अनुभव घ्या...समाधि अनुभवा. सर्व पारंपारिक संतांजवळ, योग्यांजवळ असामान्य दैवी सामर्थ्य होते, सिध्दी होत्या. त्याची विस्तृत वर्णने सगळ्या जुन्या चरित्रात उपलब्ध होती. नव्या गुरुंकडे सिध्दींचा अभाव असल्यामुळे , त्यांनी केवळ मानसिक अनुभवांवर भर द्यायला सुरुवात केली
४. अजुन थोडा काळ गेला, आता समाधी अनुभवायला देणे ही नव्या गुरुंना जमेना, मग त्यांनी ध्येय अजुन खाली आणले. मानसिक शांती, रिलॅक्सनेस, चिन्तामुक्ती , आरोग्य ही नवीन ध्येये बनली
५. शिष्याला १००% अनुभव देऊन जन्म-मरण चक्रातुन सोडवणे ही भारतीय अध्यात्माची परंपरा. नव्या गुरुंनी अनुभवाची जबाबदारी शिष्यांच्या वरच ढकलायला सुरुवात केली. सर्व प्राचीन व ऐतिहासिक गुरुंनी शिष्याची संपूर्ण जबाबदारी स्वता:वर घेतल्याचे त्यांच्या चरित्रातुन दिसते. नवे सामर्थ्यहीन गुरु नेमके उलटे करु लागले, कारण त्यांना स्वतःलाच आपल्या आध्यात्मिक उन्नती बाबत खात्री नव्हती.
६.१९४० च्या सुमारास अशांचा उदय झाला की ज्यांनी तत्वज्ञानाच्या नावाखाली मूर्तिभंजन सुरु केले. सर्व अनुभवांना विरोध करुन, शब्दच्छ्ल सुरु केला. स्थितीहीन स्थिती, कालातीत जगणे, वर्तमानात जगणे, हे सोपे असल्याचे लोकांना भासवुन उच्च बौध्दिक वर्तुळात महान तत्वज्ञ म्हणून मिरवायला सुरु केले. अनाकलनीयता व पाखंडीपणा ह्यामुळे विदेशात लोकप्रिय होण्यास ह्यांना फार वेळ लागला नाही.
७.१९८० च्या दशकात काही असे नवे संत जन्मले, जे वेदान्ताच्या नावाखाली बेधडक सांगु लागले, पुनर्जन्म वगैरे काही अस्तित्वात नाही, जे काही आहे आता इथेच . मृत्युनंतर आपण सगळेच सत्यामध्ये परत जाऊ व जन्मापूर्वी ही आपण सत्यच होतो. काही तर तुम्ही ह्या क्षणाला मुक्तच आहात, साधनेची वगैरे कोणती ही गरज नाही इ. बेलगाम असत्य प्रतिपादन करु लागले . असले पाप कृत्य करताना व बरोबर संतत्व मिरवताना त्यांना काही वाटले नाही.
८.ह्या सर्व नव्या गुरुंमध्ये एक समानता होती, अलौकिकतेला , चमत्कारांना ह्यांचा विरोध होता. कारण ह्यांच्या स्वतःजवळ ते सामर्थ्य नव्हते. सर्व सामान्य लोकांची दु:खे दुर केल्याच्या कोणत्या ही घटना ह्यांच्या चरित्रात दिसत नाहीत. सिध्दीहीन, सामर्थ्यहीन असे हे बोलबच्चन गुरु भारतीय महान योग्यांच्या परंपरेला कलंक बनुन राहिले. योगसामर्थ्य नसणे हे ह्या सर्वांचे कॉमन लक्षण होते.

१८९३ मध्ये सुरु झालेली ही परंपरा आजता गायत टिकुन आहे. अगदी १०००० कोटींची मालमत्ता ही बनवुन आहे. सर्वदुर देशात ह्यांचे आश्रम आहेत. फिलॉसोफर म्हणून ह्यातील काही जगप्रसिध्द आहेत, ह्यांचे ग्रंथ जगभर वाचले जातात. जे वाचुन अनेक लोक तात्पुरती मनःशांति मिळवतात. पण ते यु कॅन विन सारख्या उत्तेजक पुस्तकांसारखे असते. शिष्याला भवसागराच्या पार नेण्याचे अद्वितीय सामर्थ्य त्यांच्या जवळ नसते. भारतीय योग व अध्यात्म परंपरेला सगळ्यात ठेच कुणी पोचवली असेल तर ह्यांनी स्वतःच ! गेल्या साधारण शंभर वर्षात उत्पन्न झालेल्या ह्या मॉडर्न गुरुंनी !!!!!!!!!!!!!!!!!

प्रामाणिक आध्यात्मिक वाचन करणार्‍यांना वरील निष्कर्षात तथ्य वाटेल अशीआशा आहे....................
ता.क.- नावे मुद्दामुनच घेतलेली नाहीत, कारण लिस्ट मोठी होईल, व त्यातुन मुद्दा हरवेल.