Tuesday, March 29, 2011

प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक

ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो. अनेकदा प्रमाण म्हणजे बहुतेकांना प्रत्यक्ष प्रमाणच अपेक्षित असते. व त्यातून वितंडवाद निर्माण होत राहतो, ह्यासाठी थोडे प्रत्यक्ष प्रमाणाचे विवेचन अयोग्य ठरणार नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक प्रमाणे वेगवेगळ्या संप्रदायांनी मानलेली आहेत. तरी त्यातील प्रमुख तीन म्हणजे , प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. ह्यातील फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच चार्वाकवादी कवटाळून बसलेले असतात. व तर्कदुष्टता करत असतात. त्याचे कारण आपण पाहणार आहोत.
सर्व आधुनिक विज्ञान हे ’अनुमान’ ह्या प्रमाणावर प्रामुख्याने आधारित आहे. कारण गणितीय सिध्दांत हा ह्या विज्ञानाचा बेस आहे. गणित अनुमानाशिवाय दुसरे काही नसते. अणुच्या घटकांचा शोध अनुमानानेच लागत गेला. प्रत्यक्ष एलेक्ट्रोन,प्रोटोन कोणाला दिसत नव्हते. डार्विनची अख्खी थेअरी जनुकीय समानते वरुन केलेले अनुमान नाही तर दुसरे काय ? इथे ही मास्यांचे , पक्षांचे अनुकुलन होतांना कोणी ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. बिग बन्ग थेअरी, कृष्णविवरांचा सिध्दांत ही खगोलीय अनुमाने आहेत. नारळीकरांना कृष्णविवर इंद्रियांना अनुभवायला आले असे घडलेले नाही. तेथे ते अनुमानाचाच आधार घेतात तरी ज्योतिषाला विरोध करतान मात्र ग्रहांचा परिणाम मनुष्यावर कसा होतो हे मला प्रत्यक्ष दाखवा म्हणून हट्ट धरतात. हे निव्वळ काही वैज्ञानिकच नाही तर प्रत्येक चार्वाकवादी (पुरोगामी/अंधश्रध्दा विरोधक) असाच दुराग्रह धरत असतो. ह्यामागील खरी गोम काय आहे ते आपण बघू.
ईश्वराने जगत निर्माण केले हे एक हेत्वाभास नसलेले अनुमान आहे. जसे प्रकाश हा किरणांच्या स्वरुपात आहे का द्र्व्याच्या स्वरुपात आहे हे जसे अनुमान आहे तसे. किंवा अणुच्या केंद्रका भोवती एलेक्ट्रोन फिरतो हे जसे अनुमान आहे. एलेक्ट्रोन्च्या निर्मितीचे किंवा त्याहून ही सूक्ष्म असलेल्या सब-एटोमिक पार्टिकल्सचे कारण सांगता येत नाही म्हणून एलेक्ट्रोनचे अस्तित्व कोणी नाकारत नाही. तसेच ईश्वराच्या जगत निर्मितीच्या अनुमानाबद्दल ही आहे. असा सरळ तर्क न स्वीकारता. बिग बन्ग, अमिनो असिड, इ. कल्पना चार्वाकवाद्यांना स्वीकाराव्याशा वाटतात. अंतिम कारण असणारे अनुमान श्रेष्ठ का चक्राकार फिरणारे अनुमान योग्य ह्याचे उत्तर निरनिराळ्या तत्ववेत्यांनी दिले आहे. हे सर्व वेगवेगळ्या संस्कृतीतले आहेत. वैदिक नाहीत. कांट,आरिस्टोटल,प्लॆटो,डेकार्ट हे वैदिक नाहीत. आधुनिक चार्वाकवादी ह्यांपेक्षा स्वत:ला बुध्दिमान समजत असतील तर त्यांची दुर्बुध्दी त्यांना लखलाभ असो. ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना ईश्वर नकोसा होतो. हे कारण छुपे असते. ह्यांना नीतिनियम नको असतात , आपली बुध्दि अहंकाराने ग्रस्त आहे हे त्यांना मान्य नसते, मृत्यूच्या अनामिक भीतिने ते सतत पछाडलेले असतात , कदाचित नरक असेल तर आपल्याला तिथे असह्य छळ सोसावा लागेल ह्याची त्यांच्या अंतर्मनामध्ये भीती असते(पूर्वजन्मीच्या नरकभोगाची ही आठवण ही असू शकते). अशा सगळ्या न्यूनगंडातून ते आम्हाला ईश्वर दाखवा, स्वर्ग दाखवा, आत्मा दाखवा असे प्रश्न करू लागतात. साधे ज्योतिषाचेच पहा. कुणी ही ज्योतिषी हे मान्य करेल की ज्योतिष हे ग्रहांचि स्थिति व त्याचे मानवांवर होणाऱ्या परिणाम ह्यातील अनुमानांवर आधारित आहे. ग्रहांचे कोणते ही किरण नाहीत जे मानवावर पडून परिणाम करतात. चाओस थेअरी ज्यांना परिचित असेल ते जाणतील की विश्वातील प्रत्येक छोट्या घटनेचा अनेक मोठ्या घटनांशी संबंध असतो. ह्या दृष्य अनुमानाच्या आधारेच भविष्या सांगितले जाते. त्यासाठी मग , पत्रिका, हात, संख्याशास्त्र,पत्ते इ. वापरले जातात. दृश्य अनुमान व भविष्याच्या सिध्दतेचा त्याला मिळणारा आधार ह्यावर ज्योतिष शास्त्र आधारित आहे. हे समजुन न घेता ग्रह लाखो किमी दूर आहेत, ते मनुष्यावर परिणाम कसा करतील , परिणाम होताना आम्हाला का दिसत नाही असे अनेक कुतर्क करत राहतात. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होतो हे निर्विवाद अनेकांनी सिध्द करून ही ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते.कारण एकच धर्माविषयी आकस !
चार्वाकवाद्यांचे सतत एकच टुमणे असते. आम्हाला पाहायला द्या. एखाद्या प्रतिबंधित प्रयोगशाळेत जायला ही पात्रतेची आवश्यकता असते. कुणीही वेडगळ उठून तिथे जाउ शकत नाही. व मला प्रत्यक्ष दाखवाच म्हणू शकत नाही. तसेच स्वर्ग पाहाण्यासाठी ही काही पात्रतेची आवश्यकता आहे, योगातल्या सिध्दी मिळवण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. पण पात्रता न मिळवता मला दाखवाच म्हणणारे , अणुभट्टीत शिरुन मला माझ्या शरिरावर किरणोत्सर्ग दाखवा म्हणणाऱ्या पेक्षा जास्त शहाणे नसतात. कर्मसिध्दान्त, ईश्वर, आत्मा, परलोक, ह्या भक्कम अनुमानाने सिध्द केलेल्या गोष्टी आहेत. चार्वाकवाद्यांची तर्काने ह्यांचे खंडंन करण्याची कुवत नसते(ह्यांचे सर्व तर्क हेत्वाभासस्वरुप असतात). मग ते मला प्रत्यक्ष दाखवाची रट लावतात. ज्योतिषांना ज्योतिष सिध्द करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:च्या सवंगड्यांबरोबर कृष्णविवरांची यात्रा करुन , बिग बन्ग थेअरीला प्रत्यक्ष करावे व नंतर येऊन ज्योतिषाच्या सिध्दतेच्या गोष्टी बोलाव्यात.
साधे सूक्ष्मजीव पाहायला जर सूक्ष्मदर्शक लागतो, तर पारलौकिक गोष्टी पाहायला असाच पारलौकिक दर्शक लागेल हे ह्यांना समजू नये काय ? पण विज्ञाननिष्टेच्या नावाखाली सोयीस्करपणा करणाऱ्यांना कोण समजाउ शकेल ? ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने त्यांनी आधी समजून घ्यावीत व मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे. पण हे करण्यासाठी त्यांना चार्वाकवाद सोडावा लागेल त्याचे काय ?

भारतीय इतिहासातील युगपुरुषांचे खरे काळ

भारतीय इतिहासातील युगपुरुषांचे खरे काळ ............

महाभारत युध्द इ.स.पू ३१३८
श्रीकृष्ण स्वधामगमन
अर्थात कलियुगारंभ इ.स.पू ३१०२
आर्यभट्ट पहिला इ.स.पू २७६५
गौतम बुद्ध जन्म इ.स.पू १८८७
चन्द्र्गुप्त मौर्य व चाणक्य इ.स.पू १५३४
अशोक मौर्य इ.स.पू १४८२
पतंजलि इ.स.पू १२१८
आदि शंकराचार्य इ.स.पू ५०९
श्री हर्ष विक्रमादित्य** इ.स पू ४५७
चन्द्र्गुप्त-गुप्त वंशीय * इ.स.पू ३२७
विक्रमादित्य इ.स.पू ६६
शालिवाहन इ.स. ७८

वरील काळ हे हिन्दू परंपरेनुसार आहेत...व अनेक प्रामाणिक(तटस्थ) इतिहास संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार आहेत...
* हा अलेक्झांडरच्या समकालीन होता....
** अल्बेरुनीने उल्लेखलेला हाच तो शक कर्ता हर्ष

Friday, March 25, 2011

भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा

थंडीचे दिवस होते.. तुम्हाला माहिती आहेच पुण्यातील थंडी कशी बोचरी असते ते...पण आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा ह्यापेक्षा ही अधिक बोचरा आहे... माझे प्रेरणास्थान व महान इतिहाससंशोधक व विचारवंत एम.आर.गुप्ता पुणेभेटीला आले होते. मी एम.ए. केल्यापासून मी त्यांचे विचार वाचत आहे...अगदी शास्त्रीय लेखन , भारताच्या इतिहासालेखनाला त्यांनी आपल्या नवीन दृष्टीने वेगळीच कलाटणी दिली... अर्थात तशी कलाटणी गेल्या शंभर वर्षापासूनच मिळाली आहे म्हणा..मॅक्सम्युल्लरने जे एकदा नियम ठरवले...ते आजतागायत अबाधित आहेत..(टिळक त्याला मोक्षमुल्लर म्हणत असत. बिचारे टिळक..ते ही त्यांच्या प्रभावाखाली आले...व त्यांनी आर्य़ांना उत्तर ध्रुवावर नेऊन ठेवले) हा मॅक्सम्युल्लर खरा आपला माणूस...त्याने डास कॅपिटल वाचले असेल काय???? असो विषयांतर झाले .. मी माझ्या प्रेरणास्थानाविषयी बोलत होतो.. गुप्तांचे नवीन संशोधन असे की त्यांनी वेदातील काही भाग गुप्त कालखंडात(इ.स. सातवे-आठवे शतक) रचला गेल्याचे सिध्द केले... हे फारच कठीण होते... पुराणात.. महाभारतात घालघुसड झाली हे सिध्द झालेच होते ..पण ह्यां बुर्झ्वांच्या प्रिय वेदात ही सरमिसळ??? ह्या महान संशोधनाबद्दल गुप्तांचा नावलौकिक जगभर झाला... जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने तर त्यांचा खास गौरव केला..(अर्थात हा आमचाच प्राचीन अड्डा आहे म्हणा) ..तर असा महान संशोधक पुण्यात आला होता...
डेक्कन कॉलेजात त्यांचे काम होते...पुण्यात त्यांचे व्याख्यान मी आयोजीत केले होते... हा मोठा सुवर्णक्षण होता.. पुणे तसे मार्क्सवादापासून प्रत्यक्ष लांब होते..पण वैचारिक क्षेत्रात मात्र इथे आमचा हात कोणी धरणार नाही... जिथे देशातील सगळी विद्यापीठे जिथे आमच्या विचारांच्या प्रभावाखाली आहेत...तिथे पुणे काय? इथे तर संशोधनाची सुरुवातच भांडारकरांसारख्यानी केली.. ज्यांचा बुर्झ्वांना तीव्र विरोध होता... मध्येच एक राजवाडेनामक भट उपटला व काही ही प्रलाप करु लागला... पण आम्ही अशी उपेक्षा केली...की आता त्यांच्या इतिहास संशोधन मंदिरात कोणी फिरकत ही नाही...आमच्याकडे एक कसब निर्विवाद आहे... कुणी कितीही पुरावे आणले तरी त्यांना बुर्झ्वाम्हणले की काम झाले.. इथे भारतात आम्ही त्यांना मनुवादी..प्रतिगामी.. पुनरुज्जीवनवादी अशी शेलकी विशेषणे वापरतो... विद्यापीठे ..वर्तमानपर्त्रे...प्रकाशनसंस्था आमच्या ताब्यात आहेत... ह्यांनी ढिगभर पुरावे आणले तरी ते खोटे आहेत म्हंटले की काम झाले... पुण्यातील काही द्वाड संशोधकानी वेदाचा काळ ५ ते ७ हजार वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न केला..पण त्यांना शास्त्रीय मान्यताच मिळू शकली नाही.. इ.स. पूर्व १५०० ही तर मॅक्सम्युल्लर ची मर्यादा.. आम्ही अश्मयुग..ताम्रयुग..लोहयुग..अशी एकाहून एक पाचर मारुन ठेवली आहे(डार्विनच्या नसलेल्या आत्म्याला शांति लाभो)... की जरा कोणी भारतातील इतिहास थोडा मागे नेऊ लागला की लगेच..म्हणायचे...तेव्हातर लोहयुग होते...तेव्हातर लेखनकलाच नव्हती.. अस बरच काही.. आणि पुराणातील पुरावे तर मान्यच करायचे नाहीत..ते तर मनुवाद्यांचे काल्पनिक ग्रंथ !.. एकदा वेदांचा काळ जवळचा केला आणि हे मनुवादी भारतात बाहेरुन आले हे दैवी (आम्ही त्याला निसर्गनियम म्हणतो) सत्य बनवले की... सारे संशोधनच सोपे झाले... मग हे प्रतिगामी कितीही ओरडोत... त्यांचे संशोधन शास्त्रीय होऊच शकणार नाही... महाभारत..रामायण काल्पनिक आहे हे तर पूर्वीच सिध्द झाले आहे ..त्यामुळे उरते काय? ज्या राजांचे नाव दगडावर लिहून ठेवले नाही..ते अस्तित्वातच नव्हते हे मान्य केले की संपले... ह्यांचे एकापेक्षा एक राजे असे आम्ही खाऊन टाकले... विक्रमादित्य, शालिवाहन ह्यांना इतिहासातूनच हद्दपार केले... पण ह्यांनी सुरु केलेले शक गेले दोन हजार वर्षे कसे चालू आहेत हे एकटा कार्ल मार्क्सच जाणू शकेल... आम्ही चन्द्रगुप्ताला ही असच हद्दपार करणार होतो.. पण तो शिंचा मॅगेस्थेनिस... तरी आम्ही एक करामत केलीच.. अलेक्झांडर ला मौर्य चन्द्रगुप्ताच्या समकालीन बनवले ..(जो वास्तविक गुप्त कुलातील चन्द्रगुप्ताच्या समकालीन होता.) हे करुन आम्ही ह्यांच्या इतिहासात तेराशे वर्षांची पाचर मारुन ठेवली आहे.. ह्यांच्या तेरा पिढ्यागेल्या तरी हे ती पाचर काढू शकणार नाहीत..... अरेरे पुन्हा विषयांतर झाले...
तर मी सांगत होतो.. गुप्तांविषयी ज्यांनी वेदांचा काही भाग इ.स. ७ व्या शतकात आणून ठेवला... व्याख्यानापूर्वी मी त्यांना शनिवारवाडा बघायला घेऊन गेलो...मनुवाद्यांचा अड्डा बघायला त्यांचा प्रथम विरोधच होता..पण.. मीच त्यांना सांगितले..की पेशव्यांच्या इतिहासासंबंधी तुम्ही काही नवीन दृष्टी देऊ शकता का बघा... मग ते तयार झाले... आम्ही वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो... बाजीरावाच्या पुतळ्याकडे बघून त्यांनी एक सुस्कारा टाकला...
" इथे आत मध्ये उत्खनन केले तर काही अश्मयुगीन खापरे सापडतील काय?" त्यांनी विचारल..
" माहीत नाही... पण पेशव्यांच्या घरातील काही भांडी कुंडी सापडू शकतील...अशाने कोकणातून आलेल्या ह्या मनुवाद्यांना आदिवासी असंस्कृत ठरवता येईल काय?" मी विचारले..
" अंहं... त्यांना आदिवासी ठरवायच नाहीय .. तर त्यांचा उद्देश ..सातारा व कोल्हापूरची गादी बळकाउन भटशाही आणण्याचा होता हे सिध्द करायच आहे..."
" पण काशी अयोध्या मुक्त करण्यासंबंधी असलेल्या पेशव्यांच्या पत्रांचे काय? नाना फडणीस, शिंदे, माधवराव, बाजीराव ह्यांची अशी पत्रे आहेत ..?"
" कसली पत्रे ?? हे मनुवादी जर पुराणेच्या पुराणे थापा लिहू शकतात.. तर पत्रे बखरी बोगस आहेत हे सिध्द करणे काय अवघड ? आणि तुम्ही त्या नानाचे कसले नाव घेता... तो तर बाहेरख्याली .... तुम्ही तेंडुलकर वाचलेले दिसत नाहीत...?"
मी थोडा ओशाळलो... तेंडुलकर तर महाराष्टातील आमचे खरे पाईक...ज्याला घाशीराम आवडत नाही तो खरा पुरोगामी नाही असा आमचा एक उघड नियम आहे...
" अहो पण लोकांना अजुन ही पानिपत,स्वामी वाचायला आवडते..."
" वाचूदेत...एकदा आपले संशोधन झाले... की खास आपल्या लेखकाकडून पेशवे विरुध्द भोसले अशी एक हजार पानी फक्कड कादंबरी लिहून घेऊ.. बाय द वे .. तुम्ही नेमाडेंचे लेटेस्ट पुस्तक वाचले असेलच ..?" त्यांनी विचारले...
" नाही अजुन त्यात काय.. आपली नेहमीचीच मार्क्सवादी भंकसगिरी " मी उत्तरलो...
त्यांनी थोड माझ्याकडे आश्चर्याने पाहिल... व आम्ही कोकणी मनुवाद्यांच्या प्राचीन अड्ड्यात प्रवेश केला....................

Saturday, March 19, 2011

उत्क्रांतिवादखण्डन आणि डायनोसोरचे मिथक

एकच गोष्ट सतत सांगितली गेली, मनावर सतत भडिमार केला की बहुसख्यांना ती खरी वाटू लागते . ह्या दोन शतकातील सर्वात मोठी अन्धश्रध्दा कोणती असेल तर डार्विनचा उत्क्रांतिवाद ! अन्धश्रध्दा निर्मूलन संघटना व इतर पुरोगामी संघटना ही अन्धश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न करतील काय ? आपण पाहू ही अन्धश्रध्दा कशी ठरते ते . सर्वसामान्याना ह्याचा परिचय माकडापासून माणूस झाला ह्या वाक्याने असतो . ह्या सिध्दान्ताचे मुख्य तत्व असे " जे सक्षम आहेत ते वाचतात व जे वाचतात ते उत्क्रान्त होतात " ह्या सिध्दान्तामध्येच मोठा तर्कदोष आहे . कसा ते आता पाहू .
अ हा ब वर आधारित आहे व पुन्हा ब हा अ वर आधारित आहे ह्या प्रकाराला अन्योन्याश्रयदोष असे तर्कशास्त्रात म्हंटले जाते. हाच दोष उत्क्रान्तिवादाच्या मुख्य सिध्दान्ता मध्ये आहे . प्रकृतिच्या (नेचरच्या) संकटातून वाचणारे कोण ? तर जे सक्षम आहेत . आणि सक्षम कोण आहेत तर जे प्रकृतिच्या (नैसर्गिक) संकटातून वाचले आहेत . ह्या एकमेकांवर आधारित व्याख्या ना कोण सक्षम आहेत हे सांगतात ना कोण नक्की वाचले आहेत हे सांगतात . अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त ह्या सिध्दान्तावर पुढचा सारा डोलारा उभा आहे.आता ह्यातील उपसिध्दान्त म्हणजे , सुरुवातीला जलचर व वृक्ष होते, नंतर ते जमिनीवर आले . मासा पक्षी बनला हा त्याच सिध्दान्ताचा निष्कर्ष . कारण काय ? तर प्राकृतिक संकटामुळे त्याने स्वत:मध्ये अनुकुलन केले व उडण्यासाठी पंख व श्वासांसाठी नाक विकसित केले. हे कधी केले तर कोट्यवधी वर्षांपूर्वी . तेव्हा झाले ना मग आता का होत नाही ? पाण्यातुन बाहेर काढलेला मासा पक्षी बनत नाही तर मृत्यु पावतो . ह्याला उत्तर काय ? तर असे अनुकुलन होण्याची प्रक्रिया कोट्यावधी वर्षांची आहे. ह्याचाच अर्थ हे अनुकुलन कसे होते हे कुणीच शास्त्रज्ञ प्रयोगाने सिध्द करू शकणार नाही .
आता ह्यांच्याच म्हणण्यानुसार शार्क , मगरी , झुरळ इ. सर्वात प्राचीन प्राणी आहेत . मग ह्या जाति उत्क्रान्त न होता , तशाच का टिकून आहेत ? उत्तर नाही. आता ह्या पैकी काही मगरी, शार्क ह्यांचींच उत्क्रान्ति कशी झाली ? सांगता येत नाही . ंमासा व पक्षी ह्यांच्यामधील प्राणी का अस्तित्त्वात नाही ? उत्तर नाही . जी एक दोन जीवाश्मे ह्या मधल्या प्राण्याबाबत दाखवली जातात ती संशयास्पद आहेत . निर्विवाद नाहीत (जीवशास्त्रज्ञाना विचारा)
हाच प्रकार माकडाच्या एका जातिपासुन माणूस बनला ह्या मध्ये आहे. मधल्या जातिच अस्तित्वात नाहीत. एकूण विचार करता ह्याला शास्त्रीय सिध्दान्त म्हणणे हा विनोद होइल. लाखो-कोटि वर्षांची प्रक्रिया दाखवली की प्रयोग व पुरावा दोन्हीची आवश्यकता समाप्त होते . सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनिर्मिति आणि उत्क्रान्तिची मुख्य कारणे योगायोग आहेत . पृथ्वीवरच पाणी का निर्माण झाले ? कारण सुर्यापासुनचे विशिष्ट अंतर . अमिनो असिड मधले नायट्रोजन संयुग कशामुळे ? तर योगायोग. एकपेशीय बहुपेशीय कसे बनले ? संरंक्षणासाठी. पण हा सरंक्षणाचा विचार मेंदु नसताना कसा आला? उत्तर नाही .. एकुण एक सर्व प्रक्रिया ठराविक क्रमाने घडणाऱ्या योगायोगांवर अवलंबून आहे . हे काय विज्ञान झाले ?? ...............आता तुम्ही म्हणाल हे जर एवढे तर्कदुषित आहे, तर ही थेअरी एवढी प्रसिध्द का ?????????? त्याचे कारण दिसणारी समानता !!
मासे व पक्षी , चिंपांझी व माणूस ह्यांच्या गुणसूत्रांत समानता दिसते ह्याचा अर्थ असा नव्हे की एक दुसऱ्यापासून बनला . कुठला ही सबळ पुरावा व तर्कशास्त्रीय आधार नसताना वैज्ञानिकांना ह्या समानतेच्या आधारावर उत्क्रांतिच्या सिध्दांतावर पोचावे असे का वाटले ? कारण त्यांना विश्वनिर्मितीचा दुसरा प्राचीन सिध्दान्त लवकरात लवकर निकालात काढायचा होता .त्यासाठी मग हिमयुग , अश्मयुग , डायनोसोर युग इ. मिथ्या कल्पना बनवण्यात आला. त्याना मिथ्या अशासाठी म्हणत आहे कारण त्यांना कोणताही तर्कशास्त्रीय आधार नाही व प्रत्यक्षजन्य पुरावा नाही.
डायनोसोर युगासंबंधी थोड इथे सांगितल पाहिजे . ह्या विचित्र प्राण्याचे संपूर्ण सांगाडे कुठेही सापडलेले नाहीत . मोठी हाडे व हाडांची रचना सापडलेली आहे जी दुसऱ्या अज्ञात प्राण्यांची ही असु शकते . कल्पनेने वैज्ञानिकांनी हा प्राचीन प्राणी कसा असेल ह्या विषय़ी अंदाज बांधले आहेत. हा प्राणी कसा नष्ट झाला , कोणा कडेच सबळ थेअरी नाही. उल्कापाताने नष्ट झाला वगैरे कल्पना आहेत. निसर्गात नेहमी समतोल दिसुन येतो . डायनोसोर सारखा असंतुलित प्राणि जर पृथ्वीवर असता तर इथले सारे जीवनच धोक्यात आले असते . साहजिकच माणूस त्यावेळी उत्क्रांत झाला नसता . हेच नेमके ह्या वैज्ञानिकाना व तत्ववेत्यांना हवे होते. डायनोसोर ची थेअरी मांडली की आपोआप उत्क्रांतिवादाला आधार मिळतो व समाजाच्या मनातील विश्वनिर्मितिच्या अन्य श्रध्दा सहज हद्द्पार करता येतात.
जलचर, उभयचर, वृक्ष, माकडे , माणसे , कीटक, पक्षी ह्यांच्यातील जनुकीय समानते वरुन एक दुसऱ्यापासून उत्पन्न झाला अशा निष्कर्षापेक्षा , हे सर्व एकाचवेळी उत्पन्न झाले असा सिध्दान्त फार पूर्वी पासून मानव समाजाने श्रध्देने धरुन ठेवला आहे. हा समाज म्हण्जे पृथ्वीवरील धार्मिक लोकांचा समाज होय. धार्मिकलोक हे उपयोजित विज्ञानाबरोबर तर्कशास्त्र व तत्वज्ञान ह्यांचाही विचार करायचे . आजचे वैज्ञानिक निव्वळ उपयोजित विज्ञानावर विसंबून तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे दोघांचे निष्कर्ष वेगवेगळे येतात . आपण उदाहरण घेऊन समाजावुन घेऊ.
अणु हा जड आहे हे सर्वांना मान्य आहे. अनेक अणु एकत्र येऊन त्यांच्यापासुन प्रथम अमिनो असिड व नंतर एकपेशीय जीव निर्माण होण्याचे कारण काय ? आधुनिक विज्ञान सांगते योगायोग !!! आता योगायोग व्हायला काही कारण ? दुसरा योगायोग जे चुकीचे उत्तर ठरेल . कारण त्याने अनवस्था हा तर्कदोष निर्माण होतो. अनवस्था म्हणजे कधीही न संपणारी कारणपरंपरा . अनएन्डिग लूप . त्यामुळे हा सिध्दान्त चुकीचा ठरतो.
तर्कशास्त्रात कारणे दोन प्रकारची असतात . उपादान आणि निमित्त ! उपादान कारण म्हणजे, कारण स्वत:च कार्यात रूपांतरित होणे . उदा. दुधाचे दही बनणे. निमित्त कारण म्हणजे , जे कारण अलिप्त व अंतिम आहे त्याला कोणते ही अन्य कारण असता कामा नये. अणु किंवा डीनए हे जर उपादान कारण असतील तर, रुपांतरणानंतर उत्क्रांति थांबली पाहिजे .पण वैज्ञानिकांच्यामते उत्क्रांति अजुनही सुरुच आहे . त्यामुळे अणु हे विश्वनिर्मितिचे उपादान कारण होऊ शकत नाही. मग साहजिकच विश्वनिर्मितेचे कारण निमित्त व तटस्थ असले पाहीजे. हे निमित्त कारण वैज्ञानिक कधी ही मान्य करत नाहीत . कारण ह्या तर्काने त्यांच्या काल्पनिक उत्क्रान्तिवादाचे खण्डन होते व हा तर्क सरळ सरळ ईश्वराकडे घेऊन जातो .